पाणी बचतीचा विषय गंभीरच खरा...
अवघ्या तीन टक्के पाण्यावर आपला खेळ सुरू आहे.
जलसाक्षरतेची कशी निकड आहे हेच यातून लक्षात यावे.
‘लोकमत’ व रिन आयोजित जलउत्सव कार्यक्रमात बोलायचे म्हणून माहिती घेतली असता कळले की, पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रात असल्याने ते खारट बनते, ज्याचा वापरास उपयोग होत नाही.
उरते केवळ तीन टक्के पाणी.
या तीन टक्क्यातही दोन टक्के बर्फाच्या स्वरूपात असते म्हणे.
उरलेल्या एक टक्क्यातील ८५ टक्के शेतीसाठी तर दहा टक्के इंडस्ट्रीसाठी,
म्हणजे खरे तर ०.५ टक्केच पाणी पिण्यासाठी व तत्सम वापरासाठी आहे.
खरेच गंभीर आहे ही बाब.
म्हणूनच प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
चला त्यासाठी शपथबद्ध होऊया...
May 27, 2018 @ Cidco, Nashik
No comments:
Post a Comment