At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, December 31, 2021
अलविदा 2021 ...
Dec 31, 2021
अलविदा 2021 ...
वर्ष सरतंय, अनेक कडू गोड आठवणी ठेऊन.
अर्थात, कडू अधिक; कारण कोरोना गेलेला नाहीये.
उलट त्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय.
भीती वाटावी असे वातावरण पुन्हा होते आहे.
तेव्हा पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचा नसेल तर
स्वतःच स्वतःची काळजी घ्या मित्रांनो!
वैद्यकीय वर्ग अगोदरच दबावात आहे, त्यांच्यावर कामाचा दबाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेऊया.
सरत्या वर्षातील अडचणी, वाईट अनुभव आदी सारे विसरून हिमतीने, आत्मविश्वासाने व नव्या ऊर्जेने नवीन वर्षात पाऊल ठेऊया...
#अलविदा2021 #Gudbye2021 #KiranAgrawal
अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...
Dec 30, 2021
अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...
कधीकधी काय योग जुळून येतो बघा, लोकमत नाशिक मधील माझे सहकारी, उप वृत्तसंपादक संजय वाघ यांनी लिहिलेल्या 'गाव मामाचं हरवलं' या बाल कवितासंग्रहाच्या प्रकाशनास मी गेलो होतो, ती तीन वर्षांपूर्वीची आठवण आज फेसबुकने करून दिली म्हणून मी ती सकाळीच शेअर केली, आणि आजच काही वेळापूर्वी वार्ता आली की आमच्या संजय वाघ यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झाला.
अतिशय आनंदाचा व अभिमानाचा हा क्षण आहे...
पत्रकारिता करताना संवेदना जपणाऱ्या व विशेषतः बाल मनाशी संवाद साधणाऱ्या माझ्या या सहकार्याच्या अलीकडील 'जोकर बनला किंगमेकर' या कृतीस हा मानाचा पुरस्कार लाभला.
खरेच मन अभिमानाने भरून आले...
आमच्या संजय ने असेच उत्तरोत्तर कीर्तीवंत व्हावे याच सदिच्छा...
EditorsView published in Online Lokmat on Dec 30, 2021
विवेक हरविल्याचीच लक्षणे...
किरण अग्रवाल /
घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे परधर्माचा अनादर किंवा राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करण्याचा परवाना असल्याचा गैरसमज काहींनी करून घेतल्याचे दिसते, त्यातूनच बेतालपणे बरळण्याचे प्रकार वाढले असून, फुकट प्रसिद्धीचा सोस यामागे असल्याचे दिसून येते. रायपूरच्या एका कार्यक्रमात तथाकथित कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल जे अनुद्गार काढलेत त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे. असे प्रकार समाज मान्यतांना धक्का देणारे व भावना दुखावणारे तर आहेतच, शिवाय राष्ट्रद्रोह घडविणारेही असल्याने अशांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.
राष्ट्रपुरुष मग ते कोणीही असोत, कोणत्याही जाती-धर्माचे वा वर्ग विशेषाचे नसतात; समस्त राष्ट्रासाठी ते आदर्श व प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते. सन्मानजनक बोलायचे तर त्यासाठी विचार करावा लागतो, संबंधिताचे चरित्र ज्ञात असावे लागते किंवा अभ्यासावे तरी लागते; परंतु विचाराने बोलण्याऐवजी स्वतःच्या प्रचारासाठी जेव्हा कोणी बरळून गेल्याचे पहावयास मिळते तेव्हा अशांची कीव आल्याखेरीज रहात नाही. त्यांना महापुरुषाची थोरवी माहीत नसते अशातला भाग नसतो, परंतु स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी महनीय व्यक्तीवर चिखलफेकीचा मार्ग त्यांना सोयीचा व सोपा वाटतो, त्यामुळेच अशांच्या तोंडाला वेसण कशी घालता येईल याचा विचार होणे गरजेचे बनले आहे.
-----------------
अकोल्याच्या कुणी कालीचरण बाबाने नुकतेच रायपुरातील एका धर्मसंसदेच्या व्यासपीठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने धर्म प्रांतातील बुवा बाबांच्या राजकीय लालसांचा विषय चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. मुद्दाम येथे राजकीय लालसेचा संदर्भ घेतला कारण त्याखेरीज असा उद्दामपणा घडून येणे शक्य नाही. आपल्या पाठीशी कोणी तरी असल्याचा किंवा उभे राहण्याचा विश्वास असल्याखेरीज अशी मजल गाठली जात नाही. हरिद्वारमध्ये झालेल्या एका कथित धर्मसंसदेतही कुणाकडून धार्मिक विद्वेषाची भाषा केली गेली म्हणे. तेव्हा कालीचरण असो की अन्य कुणी, अशांचा उद्दामपणा रोखणे ही शासनाची व समाजाचीही जबाबदारी आहे; कारण केवळ उद्दामपणाच नव्हे तर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचा व सर्वधर्मसमभावाच्या तत्वालाच नख लावण्याचा राष्ट्रद्रोह ज्यावेळी घडून येतो तेव्हा अशांना कायद्याच्या चौकटीतुन आवर घालणे गरजेचे बनते
-----------------
दुर्दैव असे, की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यांना समाजात बहुमान लाभताना दिसतो. कुणी ऊक्तीने तर कुणी कृतीने अधर्म करताना दिसतो. कायदा आपले काम करतो, परंतु संबंधितांना त्याचे भय वाटत नाही. धर्माच्या शाली पांघरून समाजाच्या आस्था आणि श्रद्धांशी खेळणाऱ्या काही बाबांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपामुळे गजाआड होतानाही आपण पाहतो आहोत, पण तरीही अंधभक्तांच्या त्यांच्यावरील श्रद्धा दूर होत नाहीत हे आश्चर्याचेच म्हणायला हवे. बाबा गजाआड असतांना त्यांचे भक्त अजूनही मिरवणुका काढतात व त्यांनी वापरलेल्या खडावांवर डोके ठेवताना दिसतात, इतक्या आपल्या श्रद्धा अविवेकी आहेत का? भोंदू व भामट्यांची चिकित्सा करण्याचा विवेकच आपण हरवून बसलोय की काय असा प्रश्न यातून पडावा. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावयास हवी. तेव्हा समाजातील सौहार्दाचे संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून अंधश्रद्धीयांना दूर ठेवण्यासाठी सुजाण व सदविवेकी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
https://www.lokmat.com/editorial/symptoms-loss-conscience-a310/?fbclid=IwAR0U0XbGPPHwtxiX0BYPQ7hRxsKsDYeFoNloH-cOXz1SpD11ulpqqq4NTjY
नव्या वाटेवरील जुना मित्र...
Dec 29, 2021
नव्या वाटेवरील जुना मित्र...
काही मित्र असे असतात ज्यांच्या धडपडीचे नेहमी कौतुक वाटत असते, त्यामुळे ते भेटले की मन अभिमानाने भरून येते.
नाशिकचे माझे सन्मित्र योगेश पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम भेटायला आले म्हटल्यावर तसेच झाले.
योगेश जी म्हणजे हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे व निष्ठेने तडीस नेणारे अतिशय धडपडी व्यक्तित्व. आपल्या हातून काहीतरी कोणाचे तरी कल्याण व्हावे या ध्यासातून झपाटलेला हा मित्र पुण्याच्या 'एमआयटी' सारख्या नामवंत संस्थेतून नाशिकला आला आणि त्याच्याशी मैत्र जुळले. शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना एकत्र करून ग्रामविकास साधण्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न मी पाहात आलो आहे.
याच मालिकेत आता 'एमआयटी'च्या सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक म्हणून ते नवीन वाटेवर मार्गस्थ झाले आहेत. यासाठीच ते विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांचे अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर, नाशिक विभागाचे संजय भाबर, अकोला जिल्ह्याचे गाढवे पाटील व वाशिम जिल्ह्याचे त्यांचे समन्वयक तथा माझे सहकारी प्रफुल्ल बानगावकर यांना सोबत घेऊन ते कार्यालयात आलेत. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले व भरपूर गप्पाही झाल्या. खूप आनंद झाला त्यांच्या भेटीने.
इतरांपेक्षा वेगळा विचार करून नवनिर्माणासाठी झटणाऱ्या विश्वनाथजी कराड यांच्या पावलावर पाऊल ठेवत नवी वीट रचू पाहणारे राहुल कराड यांच्या क्रियाशील नेतृत्वातील 'एमआयटी'ची सरपंच संसद नवा मार्ग प्रस्थापित करेल असा विश्वास आहे...
त्यासाठी योगेश जी आपणास व आपल्या सर्व सहकारीना मनःपूर्वक शुभेच्छा...
#KiranAgrawal #MITSarpanchSansad
Tuesday, December 28, 2021
आणखी काय हवे? ...
Dec 28, 2021
आणखी काय हवे? ...
खुर्चीतला माणूस बदलला व त्याची जागाही बदलली, की माणसं व मित्रही दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण मी अपवाद ठरलो म्हणायचे.
यंदा गाव बदलले, नव्या मित्रांची भर पडली; नव्या जुन्या अशा आपण साऱ्यांनी मिळून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांची बरसात केली.
मागे पन्नाशी गाठली तेव्हा लिहिले होते, की आता कसला वाढदिवस; आता काढदिवस. परंतु आपल्या स्नेह शुभेच्छांत कसलीही कमतरता राहात नाही. त्यातूनच तर लाभून जातो नवा उत्साह, नवी ऊर्जा.
एक दिवस आधीच सुरू झालेला अग्रिम शुभेच्छांपासूनचा सिलसिला कालचा दिवस उलटून गेला तरी आजही सुरूच आहे. हा स्नेह व या प्रेमाखेरीज आणखी काय हवे?
तेच माझे बळ व तीच माझी प्रेरणा...
हे बळ यापुढेही कायम लाभेल असा विश्वास आहे.
धन्यवाद म्हणून औपचारिकपणा कसा करू?
अनेक मित्रांचे फोन घेऊ शकलो नाही, सर्वांच्याच शुभेच्छा संदेशांना उत्तरही देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
स्नेह आहेच, यापुढेही तो कायम राखूया...
#KiranAgrawal #kiranAgrawalBirthDay2021
Sunday, December 26, 2021
बळीराजाची बळीराणी ....
Dec 26, 2021
बळीराजाची बळीराणी ....
आकोट मधील शिक्षिका लता बहाकर यांनी लिहिलेल्या 'बळीराणी' कादंबरीचे प्रकाशन पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवायला मिळाले.
बळीराजाच्या दुःख दैन्याची चर्चा साहित्यात दिसते, मात्र त्याचा कणा असलेल्या त्याच्या सहचारिणीची फारशी दखल घेतली गेलेली दिसत नाही. पुरुषप्रधानतेतून ओढवलेले हे दुर्लक्ष आहे. कृषी संस्कृतीत आपल्या कष्टाने, घामाने, धीराने बळीराजाची पाठराखण करणारी राणी 'बळीराणी'मधून मांडली गेली आहे.
साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, यवतमाळचे प्रख्यात गझलकार प्रा. विनय मिरासे, साहित्यिका प्रा. डॉ. अनघा सोनखासकर, युवा लेखक उमेश अलोणे, प्रा. गजानन दांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अकोट सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन समारंभाला लाभलेली व आभार प्रदर्शनपर्यंत टिकून असलेली रसिक, श्रोत्यांची गर्दी भारावून टाकणारी होती.
उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर, पत्रकार राजू चिमणकर, दिगंबर खडसे, विनोद तळोकार, निलेश कवडे, अनिल बहाकर यांच्या नीटनेटक्या संयोजन कुशलतेतून हा कार्यक्रम घडून आला.
#Balirani #Aakot #PadmashriKamble #KiranAgrawal
Saraunsh Published in Akola Lokmat on Dec 26, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211226_9_1&fbclid=IwAR3lqkfdBpEK3LldjWC7ZsO3gKLEsnB7ju2WFTwiMSzqtq17uf2D_0CqRkE
https://www.lokmat.com/manthan/akola-airport-there-viability-transaction-shoul-be-done-a310/?fbclid=IwAR3lqkfdBpEK3LldjWC7ZsO3gKLEsnB7ju2WFTwiMSzqtq17uf2D_0CqRkE
Subscribe to:
Posts (Atom)